AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी बंधूंनो जाणते व्हा! बी-बियाणे अधिनियम वाचा सविस्तर !
समाचारAgrostar
शेतकरी बंधूंनो जाणते व्हा! बी-बियाणे अधिनियम वाचा सविस्तर !
👉🏻शेतकरी मित्रांनो आपल्या हितासाठी शासनाने आपल्या साठी चांगले व दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी बी-बियाणे अधिनियम १९६६ व १९६८ तसेच बियाणे नियंत्रण कायदा १९८३ लागू करण्यात आला हे सर्वांना माहीत असेल नसेल तरी सविस्तर माहिती देतो. 👉🏻हे लक्षात ठेवा बियाणे उत्पादक अधिसूचित असलेल्या वाणाचे अगर अधिसूचित नसलेल्या वाणाचे बियाणे स्वत: बीजोत्पादन घेऊन व स्वत:च आवश्यक त्या चाचण्या घेऊन सत्यतादर्शक लेबल लावतात.यालाच सत्यतादर्शक बियाणे म्हणतात. या प्रकारच्या पिशवीला लावलेले लेबल पिवळ्या रंगाचे असते.प्रमाणित व सत्यतादर्शक लेबलवर भारत सरकारच्या निर्देशानुसार मजकूर लिहिलेला असतो. 👉🏻लेबलवर पिकाच्या वाणाचे नाव, लॉट नंबर, चाचणी घेतलेली तारीख, बियाणाची मुदत, उगवण, टक्केवारी, वजन, बीज प्रक्रिया केली असल्यास वापरलेल्या कीटकनाशकाचे नाव, भौतिक शुध्दता व अनुवंशिक शुध्दतेची टक्केवारी हा सर्व मजकूर लिहिलेला असतो.बियाणे खरेदी करताना शक्यतो बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेली बियाणे खरेदी करावे. ते निळ्या लेबलचे असते.अधिकृत बियाणे विक्रेत्यांकडून, परवानाधारक दुकानदाराकडून बियाणे खरेदी करावे.खरेदी केलेल्या बियाणाची पक्की पावती विक्रेत्यांकडून द्यावी. 👉🏻पावतीवर घेणार्‍याचे नाव, जात, लॉट क्रमांक, उत्पादक कंपनीचे नाव हा तपशील लिहून घ्यावा. खरेदी केलेल्या बियाणांच्या पिशवीवर पिकाचे नाव, उगवणशक्ती वगैरे माहिती निर्देश केल्याप्रमाणे असल्याचे पाहून घ्यावे.पिशवीवर जो बियाणाचा दर असेल त्याच दराने बियाणे खरेदी करावे. तोच दर पावतीवर आहे का ? त्याची खात्री करून घ्यावी.दुकानदार ज्यादा दराने बियाणे विक्री करीत असेल तर निरीक्षक व वैधमापनशास्त्र विभाग अगर कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा कृषी विभाग अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे तक्रार करावी. 👉🏻नूतनीकरणाचे बियाणे असेल तर बियाणे चाचणीपासून वैध मुदत सहा महिने असते तर नवीन बियाणांची मुदत नऊ महिन्यापर्यंत असते. ते नीट पाहून घ्यावे. ज्या वाणाची ज्या हंगामासाठी शिफारस केलेली आहे, त्या हंगामातच त्या बियाणांची पेरणी करावी. बियाणे दोन वेगळ्या लॉटचे असतील तर एकत्रित मिसळून पेरु नयेत. बियाणे पेरणीची तारीख लिहून ठेवावी. पिशवीतून बियाणे काढताना खालच्या बाजूस भोक पाडून ते काढावेत. 👉🏻त्यामुळे पिशवीस असलेले लेबल व बीज प्रमाणीकरणाचा टँग व्यवस्थित राहतो. बियाणाची रिकामी पिशवी, लेबल टँग, खरेदीची पावती जपून ठेवावी, म्हणजे बियाणे बोगस निघाल्यास आपल्याला कायदेशीर कारवाई करता येते. .... 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
2
इतर लेख