AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला चाप!
कृषी वार्ताAgrostar
व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला चाप!
➡️भारतामध्ये शेतकरी वर्गासमोर अनेक वेगवेगळी संकटे असतात त्यामध्ये निसर्गाचा कोप, रोगराई इत्यादी आणि हे सर्व सहन करून सुद्धा शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव मिळत नाही या माघे फायदा व्यापारी वर्ग घेत आहे. या खरेदी आणि विक्रीच्या प्रक्रियेत व्यापारी वर्ग हात मारतात हे सर्वानाच माहीत आहे. ➡️व्यापारी वर्गाकडून शेतकरी वर्गाची तसेच शासनाची सुद्धा लूट मोठ्या प्रमाणात होत असते. या व्यापारी वर्गाच्या कारभाराला आळा घालण्यासाठी आता हंगामाच्या वेळी शासकीय केंद्रावर हमीभावाने वेगवेगळ्या पिकांची खरेदी केली जाते यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका इत्यादी परंतु विक्री करताना शेतकरी वर्गाची नोंदणी आणि विक्री करताना फोटो काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत ➡️तसेच शेतकरी वर्गाची नोंदणी करण्यावेळी हंगामाचा अद्ययावत सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स व इतर कागदपत्रे मागितली जात आहेत. सोबतच शेतकरी वर्गाचे मालाबरोबर छायाचित्रही काढणे गरजेचे केले आहे. ➡️शेतकऱ्यांना होणार फायदा : प्रत्येकवेळी शासकीय केंद्रावर गावखेड्यातील व्यापारी इतरांच्या नावाने सातबारा जोडून वेगवेगळा शेतमाल दुसऱ्याच्या नावाने विकत आहे हे सर्वानाच माहीत आहे. परंतु आजवर हे गैरप्रकार रोखणे जुळले नव्हते. आता नोंदणीपासून तर विक्रीपर्यंत खबरदारी घेणे सुरु केल्याने किमान यामुळे तरी गैरप्रकार थांबतील अशी अपेक्षा आहे. शिवाय अशा उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांनाही फायदा होईल. ➡️संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
6
इतर लेख