AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजरी पिकातील विरळणी आणि आंतरमशागत
गुरु ज्ञानAgrostar
बाजरी पिकातील विरळणी आणि आंतरमशागत
बाजरी पिकामध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी रोपांची योग्य संख्या राखणे गरजेचे आहे. यासाठी विरळणी आवश्यक असते. 👉विरळणीचे महत्त्व व वेळ ✔ पहिली विरळणी पेरणीनंतर 10 दिवसांनी करावी. ✔ गरजेनुसार दुसरी विरळणी 20 ते 25 दिवसांनी करावी. ✔ यामुळे निरोगी रोपे राहतील व वाढ चांगली होईल. 👉तण नियंत्रणासाठी उपाय ✔ बाजरीच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये तण नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे. ✔ सुरुवातीच्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत 1 खुरपणी आणि 1 कोळपणी करावी. ✔ तणामुळे पिकाला सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्यांची कमी भासू शकते. 👉पीक पोषणासाठी उपाय ✔ खुरपणीनंतर रासायनिक खतासोबत ॲग्रोस्टार भूमिका या पीकपोषकाचा वापर करावा. ✔ यामुळे सफेद मुळीची वाढ चांगली होईल व पिकाला पोषक घटक चांगल्या प्रकारे मिळतील. ✔ परिणामी, पिकाची वाढ जोमदार होऊन उत्पादनात वाढ होईल. योग्य व्यवस्थापन केल्यास बाजरीचे उत्पादन वाढून अधिक फायदा मिळू शकतो! ✅🌾 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख