AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे खतांचा पिकात वापर करताना घ्यावयाची काळजी
गुरु ज्ञानAgrostar
उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे खतांचा पिकात वापर करताना घ्यावयाची काळजी
सर्व पिकांमध्ये अधिक उत्पादन आणि चांगल्या गुणवत्तेसाठी योग्य खत व्यवस्थापन महत्त्वाचे असते. परंतु उन्हाळ्यात, विशेषतः मार्च ते एप्रिल महिन्यात, तापमान खूप वाढते. अशा परिस्थितीत काही खते आणि अन्नद्रव्यांचा वापर पिकांना हानीकारक ठरू शकतो, कारण ती उष्णता निर्माण करतात आणि त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. 👉उष्णता निर्माण करणारी खते कोणती? - कोंबडी खत – जास्त प्रमाणात उष्णता निर्माण करते. - सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) – यामध्ये 11% गंधक असल्याने उष्णता वाढते. - गंधक 90% – जमिनीत तापमान वाढवण्यास मदत करते. 👉उन्हाळ्यात खत व्यवस्थापन कसे करावे? 1. सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, जसे की गांडूळ खत व शेणखत. 2. द्रावण स्वरूपातील अन्नद्रव्ये द्या, जेणेकरून झपाट्याने उपलब्ध होतील. 3. ठिबक सिंचन प्रणालीतून विद्राव्य खतांचा वापर करा. 4. सेंद्रिय मल्चिंगचा अवलंब करा, त्यामुळे मातीतील ओलावा टिकून राहील आणि तापमानाचा परिणाम कमी होईल. योग्य खत व्यवस्थापनामुळे पिकांना उन्हाळ्यातील ताण कमी येतो आणि निरोगी वाढ होते! 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0