कृषी वार्ताAgrostar
शेतकरी अन्नदाता असून, त्यांचा सन्मान होण्याची आवश्यकता - उपराष्ट्रपती
पुणे: शेती क्षेत्राच्या विकासासाठी सिंचन, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि विमा क्षेत्राला मजबूत करून प्रयोगशाळेतील तंत्रज्ञान गावा-गावात पोहचविण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञान आणि पतपुरवठा केल्यास त्यांचे उत्पन्न ही वाढेल,असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेच्या पदवीप्रदानच्या उद्घाटनप्रसंगी मांडले.