AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
काही राज्यात जलाशयातील पाण्याची पातळी झाली कमी
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
काही राज्यात जलाशयातील पाण्याची पातळी झाली कमी
गुजरात व महाराष्ट्र व्यतिरिक्त राजस्थान, झारखंड, ओडिसा व पश्चिम बंगालमधील जलाशयांमधील पाण्याचे प्रमाण मागील दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. या कारणामुळे उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासोबत शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीसाठी पाण्याच्या कमतरतेला सामोर जावे लागणार आहे.
केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, राजस्थान, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाना आणि केरळमधील जलशयामध्ये पाण्याची पातळी मागील वर्षापेक्षा कमी आहे. जे की हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या जलाशयात पाण्याची पातळी मागील वर्षापेक्षा जास्त आहे. छत्तीसगढ आणि आंध्रप्रदेशमधील जलाशयांमध्ये पाणी पातळी मागील वर्ष प्रमाणेच आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १६ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0