जैविक शेतीअॅग्रोवन
अधिक उत्पादनासाठी जीवामृत तयार करा
जीवामृत हे किण्वन प्रक्रिया तयार करून, पिकांना मुलद्रव्य उपलब्ध करून देते तसेच पिकांचे बुरशी किडीपासून संरक्षण करत असते.
जीवामृत तयार करण्याची पद्धत –
१. बॅरलमध्ये २०० लिटर पाणी घेवून त्यामध्ये १० किलो गाईचे शेण मिसळून घ्यावे. यानंतर ५-६ लिटर गाईचे गोमुत्र, २ किलो गुळ, २ किलो डाळींचे पीठ व शेतीच्या बांधावरील मूठभर माती बॅरलमध्ये एकत्रित व्यवस्थित मिसळून घ्यावे.
२. हे तयार केलेलं द्रावण सावलीत ठेवावे. कमीत कमी २ ते ३ दिवस सावलीत ठेवून सकाळ संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. २०० लिटर जीवामृत हे एक एकर साठी पुरेसे होते.
जीवामृताचे फायदे –_x000D_
१. जीवामृत पिकांच्या वाढीचा जोम वाढवते व उत्पादनात वाढ करते._x000D_
२. पिकांमध्ये सहनशीलता वाढवते तसेच किडींना व रोगाला पिकांपासून दूर करते._x000D_
३. मातीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवते व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविते._x000D_
४. जीवामृताचा वापर सिंचनच्या माध्यमातून महिन्यातून २ वेळा करा. _x000D_
संदर्भ-http://www.fao.org_x000D_
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!