AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताAgroStar India
NPK खास – किती दिवसात परिणाम दिसतो?
👉शेतकरी बंधूंनो, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र (N), स्फुरद (P) आणि पालाश (K) या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर होणे गरजेचे आहे. नत्रामुळे पिकांची वाढ जोमदार होते, पाने हिरवीगार राहतात, तर स्फुरदामुळे फुलोरा, फळधारणा आणि मुळांची वाढ सुधारते. पालाशामुळे दाणे, फळे भरगच्च होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.👉खतांचा जास्त किंवा कमी वापर पिकासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यामुळे योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने खतांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. यासाठी माती परीक्षण करून शेतातील पोषण स्थिती समजून घेणे अत्यावश्यक आहे. मातीच्या गरजेनुसार युरिया, DAP, SSP, MOP किंवा SOP यापैकी योग्य सोर्स निवडावा.👉अन्नद्रव्यांचे संतुलन राखल्यास उत्पादनात वाढ होते, जमिनीचे आरोग्य टिकते आणि शेतकऱ्यांना जास्त नफा मिळतो. योग्य NPK व्यवस्थापन स्वीकारा आणि पिकांची उत्पादकता तसेच जमिनीची सुपीकता वाढवा.👉 संदर्भ : AgroStarवरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
96
3
इतर लेख