AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मार्च ते एप्रिल दरम्यान मान्सूनच्या आधीचा पाऊस २७% कमी
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
मार्च ते एप्रिल दरम्यान मान्सूनच्या आधीचा पाऊस २७% कमी
मार्च ते एप्रिल दरम्यान असलेला मान्सूनच्या आधीचा पाऊस हा २७% कमी झाला आहे. कारण भारतीय हवामान विभाग (आयएमडी) नुसार, देशात १ मार्च ते २४ एप्रिल २०१९ दरम्यान ५९.६ मिलीमीटर च्या सामान्य पावसाच्या तुलनेत फक्त ४३.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. हे दीर्घकालीन सरासरी प्रमाण (एलपीए) २७% कमी झाले आहे. एलपीए ५० वर्षाच्या कालावधीत दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या दरम्यान देशात झालेल्या सरासरीला पाऊस म्हटले जाते.
हवामान विभागाने सांगितले की, सर्वात अधिक ३८% कमी उत्तर पश्चिम भागामध्ये नोंदविण्यात आली आहे. या क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. यानंतर ३१ टक्के कमी दक्षिणी प्रायद्वीपमध्ये नोंदविण्यात आले आहे. ज्यामध्ये दक्षिण भारतातील सर्व पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पॉंडेचेरीशिवाय गोवा आणि तटीय महाराष्ट्र आहे. पूर्व आणि पूर्वोत्तर भारतमध्ये २३ टक्के पावसाची नोंद कमी झाली आहे. मध्य भारत एकमेव असे क्षेत्र आहे, जेथे सामान्यत: पाच टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. पूर्वोत्तर भारताच्या काही भागात पश्चिम घाटमध्ये व भारताच्या काही भागात मान्सूनच्या आधीचा पाऊस हा पिकांच्या लागवडीसाठी महत्वपूर्ण आहे. संदर्भ - आउटलूक अॅग्रीकल्चर, २९ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
21
0