AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गाभण काळातील खाद्य व्यवस्थापन
पशुपालनअॅग्रोवन
गाभण काळातील खाद्य व्यवस्थापन
• गाभण काळामध्ये जर आहाराची काळजी नाही घेतली तर बरेचसे आजार उद्‌भवतात जसे ताप येणे, दुग्धज्वर, कितनबाधा इ. असे अाजार होऊ नये म्हणून जनावरांना उत्तम संतुलित आहार देणे गरजेचे असते. • जनावरांना गाभण काळात पचनास हलका चारा द्यावा • विण्यापूर्वी किमान दीड ते दोन किलो संतुलित पशुखाद्य दररोज द्यावे. • जनावरांना शारीरिक प्रक्रियेसाठी जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा चांगल्या प्रतीचा चारा दिल्यास मिळते. शरीरस्वास्थ्य चांगले राहाते. • जनावरांच्या आहारात गरजेनुसार हिरवा चारा, वाळलेला चारा व इतर आवश्‍यक घटक वापरावे जसे की विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण, प्रतिजैविक इ. • विकारांच्या वापरामुळे खाद्य जास्त प्रमाणात पचन होऊन जास्त ऊर्जा मिळते. • प्रोबायोटिक्‍सचा वापर केल्यास उपयुक्त सूक्ष्मजिवांची संख्या वाढून चयापचय क्रिया जलद होते व शरीराला जास्त ऊर्जा मिळते.
• क्षार मिश्रण जनावरांच्या खाद्यामध्ये वापरल्यास आवश्‍यक असणारे क्षार शरीराला मिळून आजार कमी होतात. • वरील खाद्य मिश्रणाचा वापर केल्यामुळे गर्भाशयातील वासराची वाढ चांगली होते. • स्वच्छ अाणि स्वच्छ पाणी जनावरांना पिण्यासाठी नियमितपणे उपलब्ध करून द्यावे. • कॅल्शिअम, स्फुरदाचे शरीरात पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी गाय/ म्हैस विण्याअगोदर एक ते दोन आठवडे जीवनसत्त्व अ, ड-३ आणि ई युक्त इंजेक्‍शन द्यावे. गाभण काळातील व्यवस्थापनाचे महत्त्व • कासेचे आरोग्य चांगले राहते व दूध उत्पादन मुबलक मिळते. • दूध तयार करणाऱ्या पेशींना चालना मिळते, संख्या वाढते. • रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. • विल्यानंतरचे आजाराचे प्रमाण कमी होते. • जनावरांची प्रकृतीही चांगली राहते. संदर्भ –अॅग्रोवन
108
0