AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
केंद्र सरकारने साखरेचे किमान समर्थन मूल्य वाढविले
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केंद्र सरकारने साखरेचे किमान समर्थन मूल्य वाढविले
नवी दिल्ली: केंद्र सरकारने साखरेचे किमान समर्थन मुल्य विक्री भाव (एमएसपी) मध्ये 2 रुपयांची वाढ करून नवीन विक्री भाव ३१ रुपये केला आहे. अन्न मंत्रालयाने जारी केलेल्या जाहीरपत्रकानुसार, साखरेचा किमान विक्री भाव २९ रुपये प्रति किलोने वाढवून ३१ रुपये प्रति किलो केला आहे. ज्यामुळे साखर कारखान्यांना योग्य रक्कम मिळेल आणि गहूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्यानुसार रक्कम दिली जाईल. ऑक्टोबर २०१८ पासून सुरु झालेला चालू पेरणी हंगाम (ऑक्टोबर ते सप्टेंबर) प्रथम ऑक्टोबर २०१८ ते १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत शेतकऱ्यांना साखर कारखान्यांवर थकबाकी वाढून २०,१६७ कोटी
रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मंत्रालयानुसार, थकबाकीमध्ये जास्त रक्कम उत्तर प्रदेशचे शेतकऱ्यांची ७,७३९ कोटी रुपये, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची ४,७९९ रू. आणि कर्नाटकच्या शेतकऱ्यांची थकबाकी रक्कम वाढून ३.९०० रू,पर्यंत पोहोचले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) नुसार, चालू पेरणी हंगामामध्ये साखऱेचे उत्पादन एकूण ३०७ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी पेरणी हंगामात ३२८ लाख टन उत्पादन झाले होते. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १५ फेब्रुवारी २०१९
4
0