रोपांची पुर्नलागवड करताना 'या' गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रोपांची पुर्नलागवड करताना 'या' गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे!
रोपवाटीकेमधून आणलेल्या किंवा घरी तयार केलेल्या रोपांची योग्य प्रकारे पुर्नलागवड करणे गरजेचे असते. योग्य अवस्थेमध्ये व योग्य प्रकारे रोपांची पुर्नलागवड केल्यास रोपांचे नुकसान होत नाही व पीक चांगल्या प्रकारे येऊन अधिक उत्पादन येण्यास मदत होते. पुर्नलागवड करतांना पुढील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे... 👉 रोपे :- • रोपे हि सशक्त व निरोगी असावीत. रोपांवर कुठल्याही प्रकारच्या रोग व किडींचा प्रादुर्भाव नसावा. • रोपांचे वय हे योग्य असावे जास्त दिवसाची झालेली किंवा कमी वयाची असलेली रोपे पुर्नलागवडी साठी वापरू नये. • रोपांचा मूळवा हा योग्य असावा. जास्त दिवस ट्रे मध्ये रोपे राहिल्या मुळे गोळा होतात त्यामुळे व लागवडी नंतर अश्या रोपांची योग्य प्रकारे वाढ होत नाही. 👉 हाताळणी :- • रोपांची नर्सरी मधून आणल्या नंतर तसेच लागवडी च्या वेळी योग्य प्रकारे हाताळणी करावी. • ट्रे मधून रोपे काढताना व लागवड करताना रोपांची मूळे व बुड तुटणार नाही किंवा त्याला जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. 👉 हार्डनिंग- • रोपे नर्सरी मधून आणल्या नंतर लगेच रोपांची पुर्नलागवड करू नये. • रोपांना संरक्षित जागेमध्ये ठेवावे व त्यांना योग्य सूर्यप्रकाश व सावली मिळेल याची काळजी घ्यावी. रोपांच्या अवस्थेनुसार योग्य पाणी व्यवस्थापन करावे. • लागवडीनंतर बाहेरील वातावरणाचा रोपांवर परिणाम होऊ नये म्हणून हार्डनिंग करणे गरजेचे आहे. 👉 पाणी व खत व्यवस्थापन- • पुर्नलागवाडी नंतर योग्य प्रकारे पाणी द्यावे पाणी कमी पडल्यास रोपे सुकतात व अतिशय जास्त झाल्यास रोपांची मर होते त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी द्यावे. • पुर्नलागवड केल्यानंतर लगेच पाण्याद्वारे किंवा वाफ्यामध्ये झाडाजवळ जास्त प्रमाणात खत देऊ नये त्याने झाडास हानी पोहचू शकते. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
20
इतर लेख