AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात ८ हजारांवर शेतकऱ्यांचे अर्ज!
कृषि वार्तालोकमत
राज्यात ८ हजारांवर शेतकऱ्यांचे अर्ज!
अमरावती : ‘मुख्यमंत्री सौर कृषिपंप’ या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या योजने अंर्तगत मार्च २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. महावितरणने पोर्टल सुरू केल्यानंतर केवळ दहा दिवसांत सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी जिल्ह्यात ९०, तर राज्यात ८ हजार ६८५ शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने शेतकऱ्यांना वारंवार विचारणा करून मार्गदर्शन पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करण्यात येत असून, क्षेत्रीय स्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संदर्भ – लोकमत, ३० जानेवारी २०१९
3
0