AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बीचे ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
कृषि वार्तालोकमत
रब्बीचे ७१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
पुणे – रब्बीतील अवकाली पावसामुळे तब्बल ७१,२६३ शेतमालाचे नुकसाने झाले, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. कापूस, तूर, हरभरा, गहू, ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा व भाजीपाला पिकाचे अधिक नुकसान झाले आहे, कृषी विभागाने तातडीने पंचनाम करावे, असे आदेश दिल्याचे नैसर्गिक आपत्ती विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील खरिपाच्या तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. त्यात भात, ऊस, फळे व भाजीपाला पिकाचा समावेश होता. २४ डिसेंबर २०१९ ते ३ जानेवारी या दरम्यान अनेक ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच बहुतांश भाग व विदर्भातील काही भागालाही फटका बसला. संदर्भ – लोकमत, २५ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा
7
1