गुरु ज्ञानAgroStar
भुईमूग पिकावरील पाने गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रण
👉भुईमूग पिकामध्ये लहान अळ्यांचा प्रादुर्भाव हा अतिशय गंभीर समस्या ठरतो. या अळ्या सुरुवातीला पाने पोखरतात आणि नंतर एकाच पानाच्या कडांना किंवा आसपासच्या पानांना एकत्र करून गुंडाळी तयार करतात. त्या गुंडाळीत राहून पानांवर आंतरगत भाग खाऊन टाकतात. अशा पद्धतीने सतत होणाऱ्या कुरतडामुळे पिकाची पाने खराब होतात आणि संपूर्ण पीक जळाल्यासारखे दिसते.
👉जर अळींचा प्रादुर्भाव वेळेवर रोखला नाही, तर भुईमूग उत्पादनात तब्बल 24 ते 92% पर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतात किंवा बांधावर असलेली बावचीची झाडे उपटून नष्ट करावीत, कारण अळ्यांना त्या झाडांवर राहणे सोयीचे वाटते आणि तिथूनच त्या भुईमूग पिकावर येतात.
👉किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रॅनीलीप्रोल या घटकाचे रॅपीजेन हे कीटकनाशक @60 मिली प्रति एकर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर फवारणी केल्यास अळींचा प्रादुर्भाव थांबतो आणि भुईमूग पिकाची वाढ तसेच उत्पादन चांगले होते.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.