कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात 50,850 करोड जमा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम-किसान) आतापर्यंत 8.46 करोड शेतकऱ्यांच्या खात्यात 50,850 करोड रुपयांची रक्कम जमा झाली आहे. या योजनेला 24 फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होतील.
कृषी मंत्रालयाच्या मते, पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील 8.46 करोड शेतकर्यांना आतापर्यंत 50,850 करोड रुपये देण्यात आले आहेत. तथापि, कृषी जनगणना 2015-16 च्या अंदाजानुसार, या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची एकूण संख्या सुमारे 14 करोड होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची औपचारिक सुरुवात केली होती. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपयांची वार्षिक मदत होते.
संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, 22 फेब्रुवारी 2020
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.