कृषि वार्ताKrishinama
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्चला मतदान!
👉विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाकी (ता. जामखेड) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्च २०२१ रोजी मतदान होणार आहे.
👉त्याचबरोबर साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. २ साठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
👉श्री. मदान यांनी सांगितले की, उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार होते; परंतु सदस्य व सरपंचपदांच्या लिलावप्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली होती.
👉त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.२ मधील निवडणूक निष्पक्षपणे पार न पडल्यामुळे रद्द करण्यात आली होती.
👉आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार १६ ते २३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. त्यांची छाननी २४ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल.
👉नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी २०२१ असेल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
👉मतदान १२ मार्च २०२१ रोजी होईल व मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लगेचच मतमोजणी होईल.
संदर्भ - Krishinama,
यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.