अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीप कांदा काढणीचे नियोजन!
👉 पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांनी करावी.
👉 कांदा काढणीआधी १० दिवस पाणी देणे बंद करावे.
👉 खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही.
👉 अशावेळी काढणीच्या २ ते ३ दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडून घ्याव्यात.
👉 शेत कोरडे असताना काढणी करावी.
👉 कांदा काढणीनंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा.
👉 कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब मान ठेवून कापावी.
👉 नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे, चिंगळी कांदे काढून टाकावेत.
👉 चांगले कांदे गोळा करून सावलीत १० ते १२ दिवस राहू द्यावेत.
अॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.