गुरु ज्ञानकृषी जागरण
खतांचा योग्य प्रमाणात व योग्य वेळी वापर करणे आवश्यक!
योग्य खते निवडणे:
• माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे. मातीमध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्याच अन्नद्रव्यासाठी खत नियोजन करावे.
• नत्राचा पुरवठा करण्यासाठी निम कोटेड युरियाचा वापर करावा.
• मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास, पाण्यात विरघळणार्या स्फुरद युक्त खतांचा वापर करावा.
• कमी कालावधीच्या पिकांना त्वरित अन्नद्रव्य उपलब्ध होण्यार्या खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळू-हळू अन्नद्रव्य उपलब्ध होतील अशा खतांचा वापर करावा. जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फॉस्फेटिक खतांचा वापर करावा.
• शेतात कोणते पिक घेणार आहेत, त्या आधी त्या शेतात कोणते पिक घेतले होते तसेच त्या पिकात कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर केला गेला होता. या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे.
• ओलसर कमी असणार्या जमिनीत नायट्रेटयुक्त किंवा नायट्रोजनधारी खतांचा तर सिंचन आणि उच्च पर्जन्य भागात अमोनिकल किंवा अमाईडयुक्त नायट्रोजनधारी खतांचा वापर करावा.
• ओलसर भागात कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम युक्त खतांचा वापर करावा. कारण अशा भागात मातीत याची कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असते.
• आम्ल युक्त जमिनीत क्षार प्रभाव पसरवणारे नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा. तसेच फॉस्फरसच्या पुरवठ्यासाठी फॉस्फेटिकयुक्त मिश्रणाचा वापर करावा.
• वाळूयुक्त जमिनीत जैविक खतांचा अधिकाधिक वापर करा जेणेकरून अन्नद्रव्याचे पोषण होऊन कमीत कमी प्रमाणात नुकसान होईल तसेच अशा जमिनीत नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करून फवारणी करावी. चिकणी जमिनीत जास्त प्रमाणात जैविक खतांचा वापर केला पाहिजे.
खतांचा वापर कधी आणि कसा करावा:
• शेणखत, कंपोस्ट खत, हिरव्या खतासारखे सेंद्रिय खते पिक पेरणीपूर्वी शेतात चांगल्या प्रकारे मिसळून दयावे.
• फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांची पूर्ण मात्रा पीक पेरणीच्या वेळी शेतात चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळून दयावे.
• नायट्रोजन, फॉस्फेटिक आणि पोटॅशिक हि खते पेरणीच्या वेळी शेतात 3 ते 4 से.मी. खाली आणि 3 ते 4 सेंमी बाजूला दिले पाहिजे. तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त या खतांना नेहमी पिकांच्या मुळांजवळ दयावे.
• खतांना मिश्रणाच्या स्वरूपात उभ्या पिकात फवारणी केल्यास, नायट्रोजन, वायुवीजन, स्थिरीकरण, डिनायट्रिफिकेशन इ. द्वारे होणार्या नुकसानापासून वाचविले जाऊ शकते.
खतांचे प्रमाण कसे घ्यावे:
• भात आणि गहू या पिकांसाठी, जर गहू पिकाच्या शिफारशीनुसार खतांची मात्रा दिली असेल तर भात पिकाच्या पुढील पेरणीसाठी फॉस्फरस आणि पोटॅश या खतांची मात्रा देऊ नये. भात पिकासाठी निमकोटेड आणि जस्तकोटेड नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करावा.
• रब्बी पिक पेरणीच्या आधी शेतात हिरव्या खतांचे पीक घेतले गेले असेल आणि वेळेवर पीक जमिनीत गाडली गेले असतील तर रब्बी पिकांच्या पेरणीवेळी नत्राची मात्रा प्रति हेक्टरी 40 किलोने कमी करावी.
• जर शेतात शेणखत किंवा कंपोस्ट वापरले गेले असेल, तर पुढील पिकासाठी नंतर 5 किलो, स्फुरद 2.5 किलो आणि पालाश 2.5 किलो प्रती टन या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशच्या मात्रेत कमी द्यायला हवे.
• पिकाची योग्य वेळेत पेरणी केल्यास खतांची उत्पादन क्षमता वाढत असते. पिकातील दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर योग्य ठेवल्यास खतांचा योग्य आणि जास्त पुरवठा होतो.
संदर्भ:- कृषी जागरण.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.