AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापूस बियाणे विक्रीचा ‘१ मे’ चा निर्णय मागे! कृषी विभागाची माहिती.
कृषी वार्ताअॅग्रोवन
कापूस बियाणे विक्रीचा ‘१ मे’ चा निर्णय मागे! कृषी विभागाची माहिती.
•राज्यात १ मे पासून कापूस बियाणे विक्रीचा निर्णय कृषी विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांपर्यंत बियाणे पोहचल्यानंतर पूर्वहंगामी कापूस लागवड रोखणे शक्य होणार नसल्याची जाणीव झाल्यानंतरच निर्णय मागे घेण्यात आल्याची चर्चा आहे. •दरम्यान, कापूस बियाणे विक्रीबाबत सुधारीत सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.
•राज्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असल्याचा गेल्या अनेक वर्षातील अनुभव आहे. याच कारणामुळे राज्य सरकारला शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक भरपाई देखील द्यावी लागली होती.गेल्या काही वर्षांपासून राज्यात कापूस बियाणे विक्रीकरिता पॅटर्न या आनुषंगिक निश्चित करण्यात आला आहे. •त्याकरिता केंद्रीय कापूस संशोधन शिफारसीनुसारच दरवर्षी २५ मे पासून कापूस बियाणे विक्रीबाबत ठरले. १५ जूनपासून शेतकऱ्यांनी लागवड करावी, असेही शिफारशीत आहे. •परंतु यावेळी लॉकडाऊनमुळे बियाणे वाहतूक प्रभावित झाल्यास बियाणे खरेदीकरिता शेतकऱ्यांची झुंबड उडेल, अशी भिती होती. सोशल डिस्टिंगचाही फज्जा यामुळे उडणार होता.परिणामी कृषी विभागाकडून शुक्रवार पासून बियाणे विक्रीचे ठरले होते. •बियाणे विक्रीनंतर कृषी विभाग शेतकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना १५ जुनपर्यंत लागवडीपासून सोपी नसल्याने अखेर बियाणे विक्रीच्या निर्णयापासून कृषी विभागाने माघार घेतली आहे. संदर्भ - ४ मे २०२० अॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
100
0
इतर लेख