AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिकातील तण व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील तण व्यवस्थापन!
महाराष्ट्रात खरिफ तसेच रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते यामध्ये कांदा पेरणी करून अथवा पुनर्लागवड करून केला जातो. पिकात तण व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अन्यथा तण पिकासोबत अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, हवा आणि जागा यासाठी स्पर्धा करते. यामुळे उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. यावर उपाययोजना म्हणून बियाणे पेरणी केल्यावर तातडीने पेंडामिथालीन ३८.७ % घटक असणारे दोस्त सुपर तणनाशक @ ७०० मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन कोरड्या जमिनीत फवारणी करावी व त्यानंतर पिकास पाणी द्यावे. यामुळे पिकासोबत उगवून येणारे तण नियंत्रित होईल. तसेच रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर उभ्या पिकातील गोल आणि लांब पानांच्या तण व्यवस्थापन करण्यासाठी ऑक्सिफ्लुरफेन घटक असणारे गोल तणनाशक @ १ मिली आणि क्विझॉलफॉप ईथिल घटक असणारे टारगा सुपर @ २ मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. उभ्या पिकात फवारणी करताना जमिनीत ओल असणे गरजेचे आहे.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
121
37
इतर लेख