AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
एसबीआयची जमीन खरेदी योजना व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
योजना व अनुदानकृषी जागरण
एसबीआयची जमीन खरेदी योजना व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
देशातील भूमिहीन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक शेत जमीन खरेदीसाठी कर्ज देत आहे. आपल्याकडे जमीन कमी असल्यास किंवा स्वत: च्या मालकीची नसल्यास आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेत जमीन खरेदी योजनेचा लाभ घेऊ शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया जमीन खरेदी करण्यासाठी त्या लोकांना कर्ज देत आहे, ज्यांची कर्जाची रक्कम परत देण्याचा चांगला रेकॉर्ड आहे. जर आपण एलपीएस अंतर्गत शेतीसाठी जमीन खरेदी करण्याची इच्छा असेल, तर आपल्याला एसबीआयच्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी आपल्याला 7 ते 10 वर्षे मिळू शकतात. एसबीआय जमीन खरेदी योजना काय आहे? • एसबीआय प्रत्यक्षात शेतजमिनी खरेदी करण्यासाठी जमीनच्या किंमतीच्या 85% पर्यंत कर्ज देत आहे. यामध्ये कर्जाची परतफेड कालावधी एक ते दोन वर्षात सुरू होईल. जमीन खरेदी योजनेचा उद्देश? • एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेचा उद्देश छोट्या व सीमांत शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे हा आहे. यासह, शेती करणारे असे लोकपण एसबीआयच्या एलपीएस योजनेअंतर्गत जमीन खरेदी करू शकतात, ज्यांच्याजवळ पहिल्यापासूनच शेतीसाठी कृषीयोग्य जमीन नाही. कोण अर्ज करू शकेल? • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, जमीन खरेदी योजने अंतर्गत जमीन खरेदीसाठी लहान व सीमांत शेतकरी अर्ज करू शकतात, ज्यांच्याजवळ 5 एकरपेक्षा कमी असिंचित जमीन आहे. • जर एखाद्या शेतकर्‍याकडे 5 एकरपेक्षा कमी सिंचनाची जमीन असेल, तर तो एलपीएसच्या मदतीने शेतीसाठी जमीन खरेदी करू शकतो. • यासह शेतीमध्ये काम करणारे भूमिहीन मजूर पण एलपीएस योजनेअंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज घेऊ शकतात. • एसबीआयच्या एलपीएस अंतर्गत शेत जमीन खरेदी कर्जासाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे किमान दोन वर्षांच्या कर्जाची परतफेड करण्याची नोंद असणे आवश्यक आहे. एसबीआय कृषी जमिन खरेदीसाठी इतर बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या अर्जावरही विचार करू शकतात. • एलपीएसमध्ये शेतीसाठी कर्ज देण्याची एसबीआयची एकमात्र अट अशी आहे की, अर्जदारांवर इतर कोणतेही बँक कर्ज थकित नसले पाहिजे. किती कर्ज मिळू शकेल? • एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेअंतर्गत, जमीन खरेदीसाठी कर्जाच्या अर्जावर स्टेट बँक त्या जमिनीच्या किंमतीचे मूल्यांकन करेल. यानंतर, शेतजमिनीची एकूण किंमतीच्या आधारावर 85% पर्यंत कर्ज घेता येईल. • एलपीएस अंतर्गत कर्ज घेऊन खरेदी केलेली शेतीसाठीची जमीन कर्जाची रक्कम परतफेड होईपर्यंत बँकेजवळ असेल. जर अर्जदाराने कर्जाची रक्कम परत केल्यास, ती जमीन बँकेतून मुक्त केली जाऊ शकते. परतफेड कालावधी: • एसबीआयच्या जमीन खरेदी योजनेअंतर्गत, आपल्याला कर्ज घेण्यावर 1 ते 2 वर्षे विनामूल्य वेळ मिळेल. जर जमीननुसार शेती योग्य करायची असेल, तर त्यासाठी दोन वर्ष आणि जर ती पूर्वीपासूनच जमीन विकसित असेल तर एसबीआय तुम्हाला एक वर्षाची मुदत देते. • ही मुदत संपल्यानंतर आपल्याला एलपीएस अंतर्गत घेतलेले कर्ज सहामाही हप्त्याद्वारे परत करावे लागेल. कर्ज घेणारी व्यक्ती 9-10 वर्षात एलपीएस कर्जाची परतफेड करू शकते. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, जवळच्या एसबीआय शाखेशी संपर्क साधा.
192
43
इतर लेख