अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकामध्ये पाणी व्यवस्थापन!
• सुरवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्वाचा असतो.
• लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या-चौथ्या दिवशी लगेच देणे आवश्यक असते.
• पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
• पावसामध्ये १० ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे.
• हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
• पाणी व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
• तसेच जमिनीच्या मगदुरानुसार ठिबक सिंचन संच सुरवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ-संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!